ब्रिटिश सरकारच्या काळात बेकायदेशीररित्या भारतातील ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेण्यात आल्या. या वस्तूंत कोहिनूर हिरा सर्वांच्या परिचयाचा आहे. हा हिरा भारतात परत यावा म्हणून अनेक प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतर लगेचच १९४७ साली पहिला प्रयत्न करण्यात आला, पण भारताचे सगळेच प्रयत्न ब्रिटिश सरकारने हाणून पाडले. असाच एक प्रयत्न एप्रिल २०१६ मध्ये सुद्धा झाला. पुरातत्व खात्याने आत्तापर्यंत बेकायदेशीररित्या भारताबाहेर नेलेल्या वस्तूंना परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, काही वस्तू मिळवण्यात यश देखील आले. परंतु कोहिनूर हा स्वातंत्र्यपूर्व काळात भारताबाहेर नेला असल्याने तो पुन्हा भारतात आणणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तसेच इंग्रजांनी कोहिनूर लूट करून किंवा फसवून घेतलेला नाही तर तो रितसर नजराणा म्हणून राणीला भेट म्हणून दिला असल्याने कोहिनूर परत आणण्याच्या मार्गात अडचणी वाढत चालल्या आहेत.
कोहिनूरबरोबर आणखीही काही वस्तू बेकायदेशीररित्या भारताबाहेर नेण्यात आल्या. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अश्याच काही ९ वस्तूंची माहिती.....








