खान्देशातला एक महत्वाचा जिल्हा म्हणजे जळगांव. जळगांव जिल्ह्याची खरी ओळख अनेक महान साहित्यिकांचा जिल्हा अशी आहे. बहिणाबाई चौधरी, ना. धों. महानोर, बालकवी ठोंबरे यांच्यासह अनेक थोर व्यक्तिमत्वांमुळे या जिल्ह्याला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रातील इतर नद्यांपेक्षा वेगळी असलेली तापी नदी ही जळगांव जिल्ह्यातून वाहत जाते, सातपुड्याने जळगावला घेरले आहे., तर याच्या दक्षिणेकडे अजिंठा डोंगररांगा आहेत. अहिराणी हीच या जिल्ह्याची मुख्य भाषा आहे. याठिकाणी घरे बांधण्यासाठी कामाची अशी दगड, वाळू, चुनखडी ही खनिजे सापडतात. तापी नदीच्या महत्वाच्या उपनद्या या जिल्ह्यात वाहतात. त्या म्हणजे गिरणा, पूर्णा, वाघूर, भोगावती, पांझरा.






