मुंबई आणि ठाण्यात पुढील २ दिवस हिट व्हेव म्हणजेच उष्णतेची लाट असेल असेल असे भारतीय वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. आता ही उष्णतेची लाट नेमकी काय असते आणि त्यावर काय उपाय योजावा हे यानिमित्ताने थोडे सविस्तर समजून घेणे आलेच. हे आताच समजून घ्या, जेणेकरून पुढील दोन दिवस नाहीतर पूर्ण उन्हाळा थोडा कमी त्रासदायक करता येईल.
उष्णतेची लाट ही फक्त उकाडा किंवा उष्मा अधिक जाणवायला लागला म्हणून घोषित होत नाही. जेव्हा सामान्य भागातील तापमान ४० अंश सेल्सिअस आणि डोंगरी भागातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जाऊ लागते, तेव्हा उष्णतेची लाट आली आहे असे समजले जात असते.



