सध्या भारतात शेअर मार्केटबद्दल जागृती वाढतेय. एकेकाळी फक्त श्रीमंत आणि ज्यांना फायनान्सबद्दल चांगली माहिती आहे अशा लोकांचे काम म्हणजे शेअर मार्केट असे समजले जात असे. पण आता अगदी कॉलेजात जाणारी मुलंही ट्रेडिंग करतात.
इंटरनेटमुळे शेअर मार्केटबद्दल अनेक गैरसमज लोकांचे दूर होत आहेत. त्यामुळे देखील अनेकांना यात गुंतवणूक करणे धोक्याचे वाटत नाही. हे सगळे ठीक असले तरी एखादा रिक्षाचालक शेअर्समध्ये गुंतवणूक करेल याबद्दल कुणाला खरे वाटणार नाही.



