हे मंदिर बनलं आहे चक्क दारूच्या बाटल्यांनी...!!

लिस्टिकल
हे मंदिर बनलं आहे चक्क दारूच्या बाटल्यांनी...!!

मंडळी मंदिर आणि दारूचा तसा काहीही संबंध नाही. पण थायलंड मधल्या या मंदिराने ते खोटं ठरवलंय. थायलंडच्या ‘खून हान’ जिल्ह्यात असलेलं हे मंदिर चक्क दारूच्या बाटल्यांनी तयार करण्यात आलंय. या मंदिराचं नाव आहे ‘वाट पा महा चेदी काऊ’.

हे एक बौद्ध मंदिर असून त्याच्या कमालीच्या बांधकामासाठी जगभर प्रसिद्ध आहे. राव, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या मंदिराच्या आवारात असलेले विश्रांतीगृह, बाथरूम आणि स्मशान सुद्धा याच बाटल्यांनी तयार करण्यात आलेत. चला मंडळी या मंदिराबद्दल आणखी जाणून घेऊया पुढील मुद्द्यांच्या आधारे :

१. जवळ जवळ १५ लाख बियर बॉटल वापरून या मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय.

१. जवळ जवळ १५ लाख बियर बॉटल वापरून या मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय.

२. स्थानिक लोकांमध्ये प्रिय असलेली ‘चांग’ नावाच्या दारूच्या या बाटल्या आहेत.

२. स्थानिक लोकांमध्ये प्रिय असलेली ‘चांग’ नावाच्या दारूच्या या बाटल्या आहेत.

३. बांधकामात वापरण्यात आलेल्या बाटल्या हिरव्या आणि तपकिरी रंगांच्या आहेत. या दोनही रंगांचा इतक्या कौशल्याने वापर केला गेलाय की लांबून बघितल्यावर हे मंदिर बियर बॉटलने तयार केलंय हे जाणवणार नाही.

३. बांधकामात वापरण्यात आलेल्या बाटल्या हिरव्या आणि तपकिरी रंगांच्या आहेत. या दोनही रंगांचा इतक्या कौशल्याने वापर केला गेलाय की लांबून बघितल्यावर हे मंदिर बियर बॉटलने तयार केलंय हे जाणवणार नाही.

४. १९८४ साली बौद्ध भिकू स्थानिक पातळीवर पर्यावरण संरक्षण कसं होईल याचा विचार करत होते. तेव्हाच त्यांना ही अनोखी कल्पना सुचली. त्यांनी बियर बॉटलला मुख्य बांधकाम साहित्य म्हणून वापरलं. या कामासाठी स्थानिक लोकांकडून बियर बॉटल मिळवण्यात आल्या.

४. १९८४ साली बौद्ध भिकू स्थानिक पातळीवर पर्यावरण संरक्षण कसं होईल याचा विचार करत होते. तेव्हाच त्यांना ही अनोखी कल्पना सुचली. त्यांनी बियर बॉटलला मुख्य बांधकाम साहित्य म्हणून वापरलं. या कामासाठी स्थानिक लोकांकडून बियर बॉटल मिळवण्यात आल्या.

५. मंदिर तयार होण्यासाठी तब्बल २० वर्षांचा कालावधी लागला. २००९ सालानंतर याच पद्धतीने तब्बल २० इमारतींच बांधकाम करण्यात आलं. स्थानिक लोकांबरोबरच सरकारनेही यात मोठा हातभार लावला आहे.

५. मंदिर तयार होण्यासाठी तब्बल २० वर्षांचा कालावधी लागला. २००९ सालानंतर याच पद्धतीने तब्बल २० इमारतींच बांधकाम करण्यात आलं. स्थानिक लोकांबरोबरच सरकारनेही यात मोठा हातभार लावला आहे.

मंडळी, टाकाऊ पासून टिकाऊचं याहून उत्तम उदाहरण कोणतं असेल ?