भारत एक कृषिप्रधान देश आहे. आजही देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीत गुंतलेली आहे. शेतीत अनेक कारणांनी होणाऱ्या तोट्यामुळे शेतीपासून अनेक शेतकरी दूर जात आहेत. त्याचवेळी नवनवे तंत्रज्ञानाचा वापर करून कमीतकमी शेतीत जास्तीतजास्त उत्पन्न काढणारे पण शेतकरी आहेत.
आता दोन विद्यार्थ्यांनी एक भन्नाट प्रयोग शेतीसाठी केला आहे. त्यासाठी या दोघांचे सगळीकडून कौतुक होत आहे. TERI School of Advanced Studies येथे शिकणारे दोन विद्यार्थी सौर्यदिप बसक आणि लवकेश बालचंदानी यांनी शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्येवर सोपा उपाय शोधून काढला आहे. सौर्यदिप आणि लवकेश यांनी सौर ऊर्जेवर चालणारी हायड्रोपोनिक फॉडर युनिट बनवले आहे, ज्यामुळे अतिशय कमी पाण्यात आणि मातीशिवाय हिरवागार आणि पोषक तत्वांचा चारा उगवता येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांची उगवणूक क्षमता पटीने वाढवता येणार आहे.


