लू म्हणतात की, ओझोनच्या उत्तर ध्रुवीय क्षेत्रात तुलनेने २५ टक्के जास्त हानी झाली आहे. म्हणून ही नवीन व्याख्या बरोबर आहे असं म्हणायला वाव आहे. असे असताना सुद्धा उष्णकटिबंधीयातील ओझोन थर हा २२० डॉब्सन युनिट ओलांडतो म्हणून लू म्हणतात की तेथील ओझोन थराला आपण ठराविक परिमाण लावून मोजू शकत नाही. तर त्यासाठी वेगळी व्यवस्था गरजेची आहे.
ओझोन हा नैसर्गिकपणे पृथ्वीच्या समशीतोष्ण मंडळात सापडणारा पदार्थ आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील जीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. हा उपयोगी ओझोनचा थर हा काही मानवनिर्मित रसायनांमुळे वितळत आहे. ते रसायन म्हणजे मेथिल ब्रोमेड, कार्बन तेट्राक्लोराईड, हल्लोंस, सीएफसी, एचसीएफसी आणि मेथील क्लोरोफॉर्म.
वाहने, पॉवरप्लांट, इंडस्ट्री मध्ये वापरले जाणारे बॉयलर, रिफायनरीज आणि केमिकल इंडस्ट्री मुळे होणाऱ्या प्रदूषणाचे सूर्यप्रकाशासोबत प्रक्रिया होऊन हा ओझोन निर्मित झाला आहे. यातली बरीचशी माहिती आपण शाळेत वाचलेली असते. पण दिवसेंदिवस ओझोनची होत जाणारी दुरवस्था सोडल्याशिवाय यात नवी कोणतीही घडामोड घडताना दिसत नाही.
अनैसर्गिक मानवनिर्मित रसायनांच्या अतिवापरामुळे ओझोन थराची पातळी कमी होणे यालाच आपण ओझोन थर वितळणे असेही म्हणू शकतो. ओझोन हा मानवनिर्मित गोष्टींमुळे कमीकमी होत आहे, हे आता काही वेगळे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. अशातच, ODS चे आकडे हे दाखवत आहेत की ओझोनचा स्तर हा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे. म्हणजेच धोक्याची घंटा अधिकच जोरात वाजू लागली आहे.