नुकत्याच टीव्हीवर झळकलेल्या एका बातमीने आख्खा महाराष्ट्र हादरवला होता! सांगलीमधील एका कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती! या घटनेने सांगलीकरच काय संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
एका सुशिक्षित कुटुंबाने हा असा निर्णय का घ्यावा हे ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यासाठी एक चक्रावून टाकणारे कोड़े होते. पोलीस तपासाची चक्रे फिरल्यानंतर प्राथमिक तपासाअंती पोलीसांच्या हाती आलेली माहिती अशी होती की वनमोरे कुटुंबीय कर्जबाजारी झाले होते आणि यातून सुटका होणे शक्य नाही या निष्कर्षापर्यंत पोहचल्यावर त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला होता.
हे संभ्रमात टाकणारे होते.





