महाराष्ट्रात यावर्षी काही भागांत समाधानकारक पाऊस पडला आहे. तर कोकणसारख्या भागात मात्र अतिवृष्टीने नुकसान केले आहे. राज्यातील कोणत्या भागांत किती पाऊस येऊ शकतो याचा अंदाज वर्तविण्यासाठी स्वतंत्र हवामान विभाग कार्यरत आहे. पण हवामान विभागाचे अंदाज कुणी किती गांभिर्यानं घेतं हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.
अशावेळी सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये एका नावाबद्दल मात्र प्रचंड विश्वास आणि आत्मीयता बघायला मिळत आहे. ते काही सरकारी हवामान विभागात कार्यरत नाहित. परभणी जिल्ह्यात बसून ते हवामानाचा अंदाज वर्तवत असतात. पण त्यांचा अंदाज चुकला असे मात्र सहसा बघायला मिळत नाही.



