भारतात अनेक पारंपरिक खेळ खेळवले जातात. भौगोलिक रचनेनुसार अनेक स्पर्धा राज्यांत घेल्या जातात. केरळमध्ये अशीच एक भव्य बोटींची स्पर्धा दरवर्षी भरवली असते. दरवर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारी नेहरू ट्रॉफी बोट रेस आयोजित केली जाते. केरळच्या अलाप्पुझाजवळ पुन्नमदा तलावावर या शर्यतीचे आयोजन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. आजूबाजूच्या सर्व गावातील लोक येतात आणि त्यात सहभागी होण्यासाठी कुट्टनाडमध्ये जमतात. एरवी शांत दिसणारे हे सरोवर शर्यतीच्या दिवशी जणू युद्धभूमी बनते. प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी या स्पर्धेत जीव ओततो.
ही स्पर्धा जरी या दिवशी खेळवली गेली तरी याची तयारी खूप आधीपासून केली जाते. या प्रतिष्ठेच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी तयारीही एक महिन्याआधीपासून करावी लागते. या शर्यतीसाठी दोन लाखांहून अधिक लोक पुन्नमदा तलावाभोवती जमतात. भारताशिवाय जगभरातून पर्यटकही येतात. हा रेस कोर्स १३७० मीटरचा असतो. वेगवेगळ्या बोटींसाठी अनेक ट्रॅक बनवले जातात.





