बीड हा जिल्हा राज्यात अनेक गोष्टींसाठी ओळखला जातो. राजकारण असो की समाजकारण, बीडचे महत्व राज्यात कमी झालेले नाही. बीडच्या इतिहासाबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यातले एक म्हणजे हे शहर यादवकाळात वसवले गेले होते. अलीकडचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळात बीड निजामाच्या राज्यात येत होते. पूर्वी बीडचे नाव चंपावती नगरी होते. काळाच्या ओघात आणि अनेक राज्यकर्त्यांच्या शासनात हे नाव बदललेले दिसते.
बीड हा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला जिल्हा आहे. येथील काही भाग हा बालाघाट डोंगररांगेत मोडतो. जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. इथला मध्य ते दक्षिण भाग बालाघाट डोंगररांगेने व्यापला आहे, तर उत्तर भागात सपाट मैदाने आढळतात.






