संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या भवानी मातेचे मंदिर ज्या जिल्ह्यात आहे त्या उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती आज तुम्ही वाचणार आहात. तुळजाभवानीचे हे मंदिर १२व्या शतकापासून अस्तित्वात आहे. अष्टभुजा आणि सिंहावर आरूढ असलेली आई भवानी माता राज्यातील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास बघायचा म्हटलं या ठिकाणी मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादव या घराण्यांचे राज्य होते. नंतर इथे राज्य केले ते बहामनी आणि विजापूरच्या राजांनी! पुढील काळात इथे निजामाचे अधिपत्य होते. १९४८ साली संपूर्ण मराठवाडा मुक्त झाला तसे उस्मानाबादही मुक्त झाले.






