प्रेम आणि प्रेमप्रकरणांची आपल्या आजूबाजूला कमी नाही. त्यात आगळ्यावेगळ्या भन्नाट प्रेमाच्या गोष्टी आणि किस्सेही आपण नेहमी ऐकत असतो. कधी एखादा सासूला घेऊन पळून जातो तर कुणी लग्नात आलेल्या पाहुण्यांपैकी एखाद्याला घेऊन पोबारा होतो. असे अनेक किस्से कानावर येत असतात. पण कर्नाटकातला एक किस्सा मात्र जास्तच विचित्र आहे.
बॉलिवूड सिनेमांमुळे प्रेमत्रिकोण काही नवलाईची गोष्ट राहिली नाहीय. अनेक ठिकाणी एक मुलगा दोन मुली किंवा दोन मुली एक मुलगा असे त्रिकोणी प्रेम असते. यांच्यातून अनेक भांडणे उभी राहतात. कारण लग्न फक्त दोघांचे होऊ शकते. यावर तोडगा म्हणून कर्नाटकात थेट टॉस करून मुलगा कुणाला मिळेल हे ठरविण्यात आले आहे.

