महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत भाजीपाला फेकावा लागला याचे व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. खर्च सुद्धा निघत नाही असे भाव मिळत असल्यावर शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरत नाही. मध्य प्रदेशात मात्र एका शेतकऱ्याच्या भेंडीपिकाला तब्बल ८०० रुपये किलोचा भाव मिळाला आहे. देशभर या शेतकऱ्याचीच चर्चा आहे.
भेंडी ही व्हिटॅमिन ए आणि सी देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने चांगली भाजी समजली जाते. प्रत्येक रेस्टॉरंटमधल्या मेन्यूवर भेंडी असतेच. सध्या भेंडी बरीच महागली आहे. शेतकऱ्यांना तर परवडत देखील नाही अशी परिस्थिती आहे.

