महाराष्ट्र राज्याच्या नकाशात बरोबर मध्यभागी दिसणारा जिल्हा म्हणजे जालना. मराठवाड्यातील जालना इतर शहरांप्रमाणे कधीकाळी निझामाच्या राज्याचा भाग होते. पुढे मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा जालना जिल्हा नव्हता. पण बरोबर २१ वर्षांनी १ मे १९८१ औरंगाबादमधून जालना वेगळा करत त्याला जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली. जालना जिल्ह्याने राज्यासाठी सर्वबाजूंनी मोठे योगदान दिले आहे.





