चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरात जीवनसत्त्वांचे खूप महत्व आहे. प्रत्येक जीवनसत्त्व योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. कुठल्याही जीवनसत्त्वाची कमतरता म्हणजे आजाराला निमंत्रण असते. आज आपण B12 या जीवनसत्त्वाची माहिती करून घेऊयात. रक्तचाचणी केल्यास आजकाल अनेकजणांमध्ये याची कमतरता आढळेल. सध्याच्या काळात ही बाब सामान्य झाली आहे. खरतर अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. कारण याविषयी असणारे कमी ज्ञान. मात्र शाकाहारी व्यक्तींमध्येच B12 जीवनसत्त्वाची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. पण अनेक मांसाहार करणाऱ्या व्यक्तीही त्याच्या कमतरतेमुळे ग्रस्त झालेल्या दिसतात. B12 जीवनसत्त्वाचे महत्त्व, शाकाहारी व्यक्ती कुठल्या अन्नातून B 12 जीवनसत्त्व घेऊ शकतात, किती घेऊ शकतात याची उत्तरे आपण आज या लेखात पाहूयात.
शरीरात पुरेसे व्हिटॅमिन बी 12 नसल्यास आपल्याला नक्की काय लक्षणे जाणवतात?









