साप चावला की माणूस भीतीनेच अर्धा मरतो. मग काही कधी वाचलेले-ऐकलेले प्रथमोपचार आठवतात आणि आपण माणूस वाचवायचा प्रयत्न करतो. ही वेळ तशी कधी सांगून येत नाही. म्हणूनच आज बोभाटा सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करु नये याची माहिती घेऊन आलं आहे. या साध्यासोप्या ७ गोष्टी लक्षात ठेवल्या, तर आपलं आणि अशा अडचणीत सापडलेल्यांचं आयुष्य थोडं सुखकर होईल..
१. जगात फक्त २०% साप विषारी असतात. तुम्हाला चावलेला साप विषारी जरी निघाला तरी त्याचा दंश विषारी असेल याची शक्यता फक्त ५०% असते. बऱ्याच वेळा साप 'कोरडा दंश' (म्हणजे विनाविषाचा दंश) देतो. पण जर तुम्हाला दुर्दैवाने 'ओला दंश' (म्हणजे विषारी दंश) झाला असेल तरी सुद्धा घाबरून जायचे कारण नाही. योग्य आणि वेळेत मिळालेल्या वैद्यकीय सेवेने तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही.










