मंडळी, भारतात प्रत्येक दोन पावलांवर नवीन माणसं भेटतात. त्यांचे कपडे, त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान सगळंच वेगळं. भारतीय लग्नात हा वेगळेपणा जास्त ठळकपणे दिसतो. वरवर पाहता भारतात एक सारखीच लग्न परंपरा असली तरी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आढळून येतात आहेत. आता हेच बघा ना, तमिळ लग्नात नवरा मुलगा चक्क मंडपातून पळून जातो तर मुलीचा बाप त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, उत्तर प्रदेश मध्ये नवऱ्या मुलाचं स्वागत त्याच्यावर चक्क टोमॅटो फेकून केलं जातं, हे तर काहीच नाही महाराष्ट्रात मुलीचा भाऊ होणाऱ्या भावजींचं कान उपटून त्याला दम भरतो.
मंडळी, भारतीय लग्नांमध्ये अशा अतरंगी परंपरांची कमी नाही. चला तर आज अशाच १० अतरंगी परंपरांची माहिती घेऊया.










