सलमान खानचा मैंने प्यार किया आठवतोय. तोच सिनेमा ज्यात भाग्यश्री कबूतरामार्फत सलमानसाठी पत्र पाठवते. कबुतर जा जा....आठवला का तो सिनेमा?? हा तोच तोच..... बरं,आता तुम्ही म्हणाल की मध्येच कसा काय बुआ पत्राचा विषय निघाला. पत्र पाठवण्याचा, पत्र येण्याचा, पत्राची वाट पाहण्याचा जमाना तर काळाच्या ओघात नाहीसा झालाय. आता डायरेक्ट वॉट्स अँप करायचा जमाना आहे. पण....पण मित्रांनो, जगात आजही अश्या काही घटना घडतात,जिथे हा पत्र पाठवण्याचा प्रकार फायद्याचा ठरतोच ठरतो. चला तर मग पाहूया एका पत्राची आणि त्यामागच्या घटनेची गोष्ट..
मध्यप्रदेशातील बैतुलमधील मलकापूर ह्या गावी चोरी झालीये. मलकापूर मधील स्मशानभूमीत एकूण ७० झाडे आहेत. चोरांनी स्मशानभूमीतील झाडांना पाणी घालण्यासाठी असलेली १५० फूट लांब पाईप चोरून नेला आहे.



