अंधश्रद्धा हीच दृढ श्रद्धा वाटू लागते तेव्हा लोक कोणतेही कृत्य करण्यास धजावतात. अगदी महिना-दीड महिन्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात एका मुलाचा नरबळी दिल्याची घटना तुम्ही ऐकलीच असेल. अंधश्रद्धा जेव्हा कुणाच्याही मनाचा ताबा घेते तेव्हा त्यातून काय निष्पन्न होऊ शकते हे एक याचे ताजे उदाहरण! आजच्या तंत्रज्ञान युगातही अंधश्रद्धा लोकांवर इतकी हवी होते हे पाहून सखेद आश्चर्य वाटते.
दोन वर्षांपूर्वी अशाच अंधश्रद्धेतून दिल्लीतील बुरारी भागातील संत नगरात राहणाऱ्या भाटीया कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली होती. कुटुंब म्हणजे अगदी भारतीय कुटुंबपद्धतीला शोभणारे तीन पिढ्यांचे एकत्र कुटुंब. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य ७७ वर्षांची आजी होती, तर सर्वात लहान सदस्य म्हणजे तिचा पंधरा वर्षाचा नातू. दोन भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची दोन-दोन मुले, एक बहिण आणि तिची मुलगी असे एकूण अकरा जणांचे हे एकत्र कुटुंब आणि एकेदिवशी सकाळीच या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांनी पहिले. खरे तर आत्महत्या रात्रीच केल्या गेल्या होत्या. पण त्याची माहिती पोलिसांना सकाळी मिळाली




