मंडळी, कधी कधी वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी पण घडत असतात. आज आम्ही जी बातमी आणली आहे ती याच कॅटेगरीतली आहे. जास्त वेळ न दवडता गोष्ट ऐका.
मोठमोठ्या शहरात मोठमोठे ट्राफिक जाम असतात हे तुम्हाला माहित असेलच. ट्राफिक म्हणजे डोकेदुखी हे समीकरण आहे, पण याच ट्राफिकने एका माणसाचं अपहरण होण्यापासून वाचवलं आहेआहे. त्याचं झालं असं, की दिल्लीमध्ये राहणारा रिजवाल नावाचा माणूस रात्रीच्यावेळी घरी जाण्यासाठी निघाला होता. तो आपल्या कारपर्यंत जाणार इतक्यात दरोडेखोर आले आणि त्यांनी त्याची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी त्याला जबरदस्ती आत ढकलून कार ताब्यात घेतली.


