१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार तसेच अकोला आणि वाशीम असे नविन जिल्हे निर्माण करण्यात आले. अकोला हा जिल्हा मात्र महाराष्ट्र स्थापनेपासूनच स्वतंत्र जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याआधी अकोला मुंबई प्रांताचा भाग होते. अकोला प्रशासकीय दृष्ट्या ६० वर्षे जुना असला तरी महाराष्ट्राच्या पूर्वेकडील या जिल्ह्याचा इतिहास मात्र मोठा आहे.
निजामाच्या ताब्यात असणाऱ्या हैदराबाद संस्थानात जो प्रदेश येत होता. त्यात अकोला देखील होता. अकोला जिल्ह्याची नावाबद्दल प्रचलित असलेली कथा म्हणजे अकोलसिंग नावाच्या एका सरदाराने हे शहर वसवले म्हणून याला अकोला नाव पडले.




