जागतिक स्तरावरील कुठलीही स्पर्धा असली की त्यात आपला देशाचा स्पर्धक जिंकायला हवा असे प्रत्येक देशवासियाला वाटत असते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत देखील आजवर जे भारतीय जिंकले त्यांना मोठा सन्मान देशात मिळाला आहे. यावर्षीही हरनाज सिंधू या तरुणीने मिस युनिव्हर्स जिंकल्यावर देशभर तिचे कौतुक झाले होते. पण एकेकाळी एका भारतीय तरुणीने ही स्पर्धा हरून देखील देशात नाव केले होते.
१९५२ साली पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा जिंकली होती आर्मी कुसेला यांनी. त्यावेळी भारताकडून स्पर्धेत इंद्राणी रहमान यांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा जरी त्यांनी जिंकली नसली तरी त्यांचा आत्मविश्वास आणि धीट अंदाज यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. स्वीमसूटवर गजरा आणि कपाळावर बिंदी लावून त्यांनी या भन्नाट कॉम्बिनेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.


