काल ना.धों.ताम्हणकर या लेखकांचा स्मृतीदिन होता.या लेखकाचे नाव फारसे आता चर्चेत येत नसल्याने पटकन काही संदर्भ आठवेल असे नाही पण दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात ताम्हणकरांच्या पुस्तकावर आधारीत 'गोट्या' नावाची एक मालिका गाजली होती. कदाचित ती मालिका पण आठवत नसेल पण त्या मालिकेचे शिर्षकगीत आजही लोकप्रिय आहे. हा लेख पुढे वाचण्याआधी ते गाणं आधी ऐकू या !! अरुण इंगळे यांनी गायलेले अशोक पत्की यांनी संगीत दिलेले हे गीत मधुकर मधुकर आरकडे यांनी लिहिले होते.
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ,त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री,चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात?
अंकुराचे होता रोप,होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात,उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली,प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात?
*मधुकर आरकडे



