लहानपणी प्रत्येकाला एकदातरी असे वाटते की आपण क्रिकेटर व्हावे. कारण भारतात क्रिकेटला दिले जाणारे महत्व हे इतर कुठल्याही खेळाच्या मानाने प्रचंड आहे. ज्यामुळे क्रिकेटर होण्यासाठी खूप स्पर्धा असते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करूनही एखादा यशस्वी क्रिकेटर होईल की नाही हे सांगता येत नाही.
भारतीय संघात स्थान मिळूनही ते स्थान टिकवून ठेवणे सोपे नसते. आयपीएल हा एक चांगला मार्ग खेळाडूंपुढे निर्माण झाला आहे. पण आयपीएलमध्येही चांगली बोली मिळेलच असे नसते. मग खेळाडू परदेशी स्पर्धांमध्ये भाग घेतात. पण त्यासाठी त्यांना भारतातून निवृत्त व्हावे लागते. गेल्या काही काळात भारताचे काही खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्त झाले आहेत. याच खेळाडूंची माहिती आपण घेणार आहोत.





