साधारणत: २००४च्या त्सुनामीनंतर कधीतरी चेन्नईत राहणार्या शेखरला त्याच्या घरामागे दोन पोपट दिसले. त्याने त्या पोपटांना खाऊ घातलं. आपल्याला माहित आहेच, एकदा का एके ठिकाणी खायला मिळतं हे कळालं की तिथे प्राणी गर्दी करतात. इथंही तेच झालंय. होताहोता पोपटांचे थवेच्या थवे या शेखरच्या घरी येत आहेत आणि तोही न थकता या सार्यांची भूक भागवतोय.
चला, आज जाणून घेऊया या शेखर आणि त्याच्या हिरव्या मित्रांबद्दल..




