मंडळी, भारतात अनेक निवडणुका गाजल्या, पण पहिली सार्वत्रिक निवडणूक ही ऐतिहासिक ठरली. त्यावेळच्या परिस्थितीचा जर विचार केला तर लक्षात येईल, की बहुसंख्य नागरिकांना निवडणुका काय असतात हेच माहित नव्हतं. सुरुवातीला राजेशाही आणि नंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून गेलेल्या भारताला नवीन राज्यपद्धती समजून घेण्याचा तो काळ होता. महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात नागरिक निरक्षर होते. अशा परिस्थितीत निवडणुका नेमक्या कशा पार पडल्या, मतदान कसं करण्यात आलं, नेमक्या काय अडचणी आल्या, त्यांच्यावर मात कशी करण्यात आली याबद्दल जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल.
चला तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने ऐतिहासिक ठरलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल जाणून घेऊया.








