ये मच्छर
जिसका कीचड़ो में घर है
नालियों में बसेरा है
इसकी पहचान ये है के
ये न तेरा है न मेरा है
साला एक मच्छर आदमी को…
आठवला ना हा डायलॉग? नाना पाटेकर यांच्या तोंडी असलेला यशवंत सिनेमा मधील हा संवाद प्रचंड गाजला होता. कारण काय असेल बरे? कारण लोक खरोखर मच्छरांना वैतागलेले असतात आणि त्यांच्या मनातली खदखद नाना पाटेकरांनी व्यक्त केली म्हणून हा संवाद डोक्यावर घेतला गेला.
खरं आहे ना मंडळी? कानाभोवती गुणगुण करणारे, आपले रक्त शोषणारे, रोगराई पसरवणारे डास म्हणजे आपले जानी दुश्मन असतात. इतकुसा जीव तो… पण आपली त्रेधा उडवतो!








