NCFचे संस्थापक आणि तेथेच कार्यरत असलेले शास्त्रज्ञ ‘एम. डी. मधुसूदन’ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार eBird (www.ebird.org) या ग्लोबल सिटीझन सायन्स प्रोजेक्टमध्ये दहा हजारांहून अधिक पक्षीनिरीक्षक आपली निरिक्षणे नोंदवतात. eBirdचे स्मार्ट फोन app वापरून हे निरीक्षक देशाच्या विविध भागांत आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद करतात. मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेल्या या नोंदीवरून पक्ष्यांचे हवामानानुसार होणारे स्थलांतर समजते. त्यातच चातक पक्ष्याचीही नोंद असते. ही निरीक्षणे एन. सी. एफ. साठी अत्यंत मार्गदर्शक आहेत. जिथे जिथे चातक आढळला तिथे तिथे त्याच्या दर्शनापाठोपाठ पावसाचे आगमन झाले. गूगल अर्थ इंजिनचा उपयोग करुन ४० वर्षे पडलेल्या पावसाचा डेटा उपलब्ध आहे. या डेटावरून चातक आणि पावसाच्या आगमनातील संबंध स्पष्ट झाला आहे.
मधुसुदन म्हणतात ,”गूगल नेहमीच माणसांच्या समस्यांना अग्रक्रम देत आला आहे, आणि या ग्रहाचे हित यापेक्षा मोठी समस्या कोणती असणार आहे?
केवळ आजीच्या गोष्टीमधील दंतकथा किंवा वांग्मयातील प्रियकर प्रेयसीच्या प्रतीक्षेला अधोरेखित करणारे रूपक इतकेच चातकाचे अस्तित्व राहिले तर?
माणूस आपल्या ग्रहाला त्याच्या गरजासाठी स्वार्थभावनेने कसाही वापरत आहे. अपरिमित जंगलतोड़ करत आहे ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. पाऊस संपला की पावसाची वाट पाहणारा चातक देखील या जगाच्या नकाशावर दिसणे बंद होइल का? पाउस आहे म्हणून चातक आहे, चातक आहे म्हणून पाऊस आहे, असं परस्परांवर अवलंबून असणारं त्यांचं नातं नष्ट होइल इतका माणूस निसर्गाच्या घडामोडीत हस्तक्षेप करत राहिला तर?