टेलर बरीच वर्षे शोरापुरात राहिला. तिथलाच झाला.दरम्यान वेंकटाप्पा मोठा झाला.राणीने मधल्या काळात प्रियकर बदलला.नवा प्रियकर आला.त्याचाही बंदोबस्त टेलरने खुबीने केला.पुढे राणीलाही ब्रिटिशांनी वटहुकूम काढून मोकळे केले.डोळ्यात पाणी आणून राणीने राजवाडा सोडला.तिच्यासाठी मेणा बाहेर तयार होता.त्यात बसून तिने राजवाडा कायमचा सोडला.खरं म्हणजे त्या वेळी वेंकटाप्पानेही सुटकेचा निःश्वास सोडला.त्यालाही आई राजवाड्यात नकोशी झाली होती.
वेंकटाप्पा राज्यकारभार करू लागला. टेलरला तो मान देत असे.पण आता टेलर समजून चुकला की आप्पा म्हणत धावणारा राजा वेगळा होता.वेंकटाप्पाचा यथावकाश विवाह झाला.त्याचा विवाह तो सात वर्षांचा असतानाच ठरलेला होता.त्याची पाच वर्षांची वधूही टेलरने एका समारंभात पाहिली होती.वेंकटाप्पाला नंतर तीन बायका होत्या.आता त्याला मद्याचेही व्यसन लागले. सत्तेचा मद त्याच्या व्यक्तिमत्त्वात भिनत गेला.
या दरम्यान, टेलरची बदली झाली. टेलरने शोरापूर संस्थान सोडले. वेंकटाप्पा आता खराखुरा राजा झाला होता.



