पब्लिक टॉयलेटचा वापर सहसा तशी वेळ आल्याशिवाय करणं लोक टाळतात. कारण सोपे आहे. त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधी. यामुळे सहसा अशी ठिकाणे टाळली जातात. या दुर्गंधीमागे त्या ठिकाणी असणारा अमोनिया कारणीभूत असतो. मूत्रात पाणी मिश्रित झाल्यावर अमोनिया तयार होतो. तो वास जाण्यासाठी तुमच्यापैकी अनेकजण याच कारणाने दोनवेळा फ्लश करत असतील.
पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयात एकावेळी फ्लश केल्यास ६ लिटर तर पुरुषांच्या युरिनलमध्ये ५ लिटर पाणी फ्लश होत असते. हे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी मुंबई येथील जलसंवर्धनात काम करणाऱ्या नेहा बगोरिया यांनी भारी शोध लावला आहे. त्यांनी ecotrapin नावाचीक यंत्र डिव्हाईस बनवले आहे. हे यंत्र मुतारीला दुर्गंधीमुक्त आणि पाणीमुक्त करू शकते.
या यंत्राचा वापर केल्यास लघवी केल्यानंतर एकदाही फ्लश करण्याची गरज उरत नाही. आपण नेहमी जशी युरिनलची साफसफाई करतो तेवढीच यासाठी पुरेशी असेल. पुरुष युरिनलच्या ड्रेन्समध्ये हे यंत्र बसवल्यावर ते आपले काम आपोआप करते. आजवर अशी ८०० यंत्रे भारताबाहेर पाठवले गेली आहेत आणि आजवर या यंत्रांनी तब्बल १ लाख ६७ हजार ९०० लिटर पाणी वाचवले आहे.




