भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली असा प्रसंग म्हणजे १९६२ साली चीनविरुद्ध झालेले युद्ध!! अनेक वर्ष कुरबुर केल्यावर शेवटी चीनने भारतावर हल्ला केला होता. त्या युद्धात जरी देशाला पराभव बघावा लागला तरी त्याआधी आणि त्यानंतर अनेक वेळा भारताने चीनला पाणी पाजले आहे. चीनी ड्रॅगनला जागा दाखवणाऱ्या अशाच एका शूर सैनिकाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत.
२० ऑक्टोबर १९६२. चीनी सैनिकांनी चुशूल एयरफील्डवर कब्जा मिळवण्यासाठी लडाखच्या एका पोस्टवर तोफेच्या माध्यमातून बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. चीनच्या या घुसखोरीचा सामना करण्यासाठी पॅगोंग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर गोरखा रायफल्सचे काही जवान तैनात करण्यात आले होते. या सैनिकांनी आपल्या शौर्याने चीन्यांना एकदा नाहीतर तीन वेळा माघार घ्यायला लावली.



