कारगिल युद्धात मोलाची कामगिरी बजावून अतिशय कठीण परिस्थितीत देशाला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांचा देशातील नागरिकांना नेहमी अभिमान वाटत आला आहे. याच सैनिकांपैकी एक कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या शौर्याची गाथा आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
कॅप्टन बात्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झाला होता. त्यांच्या सैन्य जीवनाची सुरुवात ६ डिसेंबर १९९७ रोजी भारतीय सेनेच्या १३ जम्मू काश्मीर रायफल्स मधून केली होती. त्याच काळात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांचा वेष धारण करून आलेल्या पाकिस्तानी सैन्यामध्ये संघर्ष सुरू होता.



