१३ ऑक्टोबर १९४८. ही ती तारीख आहे जेव्हा पाकिस्तानने तिथवालच्या रिचमार गल्लीतून हल्ला करत भारतीय सेनेला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित असलेल्या शीख रेजिमेंटच्या एका जवानाने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
पाकिस्तानने एकामागे एक करत तब्बल ८ वेळा हल्ला केला पण पठ्ठ्याने त्यांना एकदाही पुढे सरकू दिले नाही. लान्स नायक करमवीर सिंग असे त्या सैनिकाचे नाव!! १९४८ साली त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.



