जर तुम्ही मिलिएनल म्हणजे नव्वदीच्या दशकात जन्माला आला असाल तर अल्ताफ राजाचं 'तुम तो ठहरे परदेसी' हे गाणं आठवत असेलच. त्यावेळी या पुढची सगळीच हिट्ट गाणी फक्त अल्ताफ राजाचीअसतील असं लोकांचं मत होतं. ते गाणं आलं आणि गेलं.आता कोणी मुद्दाम आठवण करून दिली तरच अल्ताफ राजा लोकांना आठवतो.थोडक्यात सांगायचं असं होतं की एक गाणं म्हणजे सगळीच गाणी नाही.
आज या गाण्याची आठवण होण्याचं कारण असं आहे की काहीच महिन्यांपूर्वी 'झोमॅटो'चा आयपीओ येऊन गेला आणि त्या आयपीओने लोकांना भरपूर पैसे कमावून दिले.आता तसाच 'न्यू टेक कंपनी' या सदरात मोडणारा 'पेटीएम' चा इश्यू आज बाजारात येतो आहे.या आयपीओत पण अशीच बक्कळ कमाई होणार असं काहींचं मत आहे.तर काही जणांच्या मते झोमॅटोचा सक्सेस अल्ताफ राजाच्या गाण्यासारखं होता.पेटीएमला तेच यश मिळेल असं नाही.काय घडणार आहे ते काही दिवसातच कळेल पण तोपर्यंत पेटीएमच्या आयपीओबद्दल वाचून घेऊ या.








