क्रिकेटमध्ये भारी कामगिरी केली म्हणून आजवर अनेकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार तसेच इतरही पुरस्कार दिले जातात. पण ज्यांच्या नावावर स्पर्धा भरवल्या जातात असे खेळाडू मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. दुलिपसिंगजी, रणजितसिंगजी, विजय हजारे, डी. बे. देवधर, झेड. आर. इराणी ही त्यातली काही नावे. या यादीतलं आणखी एक नाव म्हणजे सय्यद मुश्ताक अली!!
ज्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून खेळाडू भारतीय संघातील आपले स्थान पक्के करतात ती स्पर्धा म्हणजे सय्यद मुश्ताक अली स्पर्धा!!! ज्या सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून ही स्पर्धा भरवली जाते, त्यांच्याबद्दल आज आपण वाचणार आहात.







