हा लेख म्हणजे मणिपूरच्या समस्येचा सामाजीक दृष्टीकोनातून घेतलेला हा आढावा आहे. बोभाटा कोणत्याही राजकीय वैचारिक पृथ:करणात भाग घेत नाही हे लक्षात घेऊन हा लेख वाचावा.
अप्रतिम निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेले राज्य म्हणजे मणिपूर! भारताच्या पूर्व टोकाला असणारे हे राज्य नागालँड, आसाम, मिझोराम या राज्यांसोबत तसेच म्यानमार या देशासोबत आपली सीमा जोडून आहे. मणिपूर मधील अनोखी संस्कृती,पद्धती याबाबत साऱ्यांनाच कुतूहल असते. हा भाग उंच सखल पर्वतांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. इथे आदिवासी लोकांचे प्राबल्य आहे.पण आज मणिपूर चर्चेत आहे ते वेगळ्याच कारणाने… मागच्या काही दिवसांपासून इथे हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय. हजारो माणसे विस्थापित झाली आहेत, शेकडो माणसांनी प्राण गमावला आहे किंवा जखमी झाले आहेत. या हिंसाचारामागे काय कारण आहे? या दंगली का पेटल्यात? चला तर मग जाणून घेऊ.




