एक काळ होता जेव्हा रुपयांची किंमत सोळा आणे होती. १ एप्रिल १९५७ पासून आपण दशमान पद्धती स्वीकारली आणि रुपयाची किंमत शंभर पैसे झाली.
पै गेले, आणे गेले, पण रुपया तसाच राहिला. प्रत्येक काळात रुपयाची अनेक ऐतिहासिक रुपं नजरेस येतात. ज्या काळातील कागदपत्रं असतील त्यानुसार रुपया बदललेला दिसतो. महाराष्ट्रात व्यवहारातील करार-मदार नोंदवणारी बहुतेक कागदपत्रं मोडी लिपीत आढळतात. या कागदपत्रांत तर अनेक वेगवेगळे रुपये नजरेस येतात. एका प्रकारचा रुपया दुसर्या रुपयापेक्षा वेगळाच असतो. त्या रुपयांचं कोष्टकही वेगळं असतं.










