मागे एक मेसेज फिरत होता की आपल्याला कशी मेट्रो हवी आहे, पण आपण तिथले चांगले सामान घरी घेऊन जातो. आपल्याला चांगली हॉटेल्स हवी आहेत पण आपण तिथले चमचेसुद्धा घरी घेऊन जातो. मध्यंतरी सरकारने तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. चाळू झाल्याच्या अगदी काही दिवसांनी लोकांनी तिच्या काचा फोडल्या, सीट्स फाडल्या, स्क्रीन्स चोरल्या किंवा तोडल्या.. काही लोकांना असे प्रकार करण्यात आसुरी आनंद होतो! मग जर असे असेल तर सरकारने कितीही चांगली योजना आणली तरी काय फायदा राव!!
एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता भारतीय लोक चांगल्या गोष्टींसाठी अजून तयार नाहीत असा त्या मेसेजचा सारांश होता. त्यावर बऱ्याच लोकांनी आपण कसे चांगले आहोत, कसे दुसऱ्यांना मदत करतो याचे काही दाखले द्यायला सुरुवात केली. पण मंडळी, आता एका घटनेने तो संदेश किती खरा होता हे सिद्ध झाले आहे. या एका घटनेने जगभरात भारताची मान शरमेने खाली गेली आहे राव!! भारतीयांनी या घटनेचा निषेध केलाय आणि पाकिस्तानी पब्लिक तर आधीच उड्या मारायला लागली आहे.
