१२ मार्च १९९३ हा दिवस नेहमीच्या दिवसा सारखाच एक साधारण दिवस होता. मुंबईत लोक आपापल्या कामात व्यस्त होते. त्या दिवसानंतर मुंबई पूर्णपणे बदलणार आहे याची कोणाला शंकाही आली नव्हती. या शांत दिवसाला ग्रहण लागलं ते दुपारी १.३० वाजता. मुंबईतल्या शेअर मार्केटच्या इमारतीच्या तळमजल्यावर पहिला बॉम्बस्फोट झाला. यानंतर तब्बल १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई सुन्न झाली. तो शुक्रवारचा दिवस असल्याने त्याला आजही ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून ओळखलं जातं.
काल या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली. आज आपण पाहूयात त्या दिवशी नेमकं काय घडलेलं ? या घटनेमागे कोण होतं ? आणि हा मृत्युकांड टाळता आला असता का !!








