गेला दीड महिने सुरू असलेले अझरबैजान आणि अर्मेनिया या दोन देशांमधले युद्ध तहाद्वारे संपले आहे. तह झाला असला तरी या युद्धात अझरबैजानने विजय मिळवला आहे. या तहाद्वारे अझरबैजान या देशाला अर्मेनिया काही भूभाग देणार आहे.
नागोर्नो काराबाख नावाचा प्रदेश आता अझरबैजानचा भाग असणार आहे. ही जागा आधीपासूनच अझरबैजानची मानली जाते, पण त्या जागेवर अर्मेनियाचे लोक राहत असत. ही जागा सोडताना अर्मेनियन लोकांना प्रचंड दुःख झाले आहे. लोकांनी निघताना आपल्या घरांना आग लावून दिली. लहान मोठे सगळेच नागरिक रडताना दिसत होते. एवढी वर्ष ज्या जागेवर वास्तव्य केले, ती जागा तिथल्या आठवणी सोडून जाताना दुःख होणे साहजिक होते. अर्मेनियन लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही आमची संपत्ती नष्ट करू पण अझरबैजानच्या हातात जाऊ देणार नाही.






