मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची-२६ नोव्हेंबर २००८-ची ती काळरात्र आपण कधीच विसरू शकत नाही.ताज हॉटेल वरच्या मजल्यांवर लपून बसलेल्या अतिरेक्यांना नेमके हेरून संपवण्यासाठी रात्रभर नौदलाची हेलीकॉप्टर आकाशात भिरभिरत होती. आपण सर्वजण जेव्हा हे घडताना टिव्हीवर बघत होतो त्याच वेळी मुंबईच्या आयआयटी होस्टेलमध्ये काही विद्यार्थी पण हे बघत होते. सर्वांच्या मनात एकच विचार घोळत होता.या हेलीकॉप्टरच्या ऐवजी आपल्याकडे 'ड्रोन' असते तर हे काम फारच सोपे झाले असते.त्यावेळी मानविरहित -सुटसुटीत- चपळ - दूरसंपर्कावर काम करणारे ड्रोन असते तर आणखी काही निष्पाप लोकांचे प्राण वाचू शकले असते. त्याचवेळी काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपण ड्रोन बनवणारी कंपनी सुरु करूया आणि जन्म झाला 'आयडियाफोर्ज'या कंपनीचा !



