जगभर विविध टाईमझोन आहेत. काही देश इतके मोठे किंवा आडवे पसरलेले आहेत की एका देशातच वेगवेगळे टाईम झोन्स आहेत. ग्रीनीचमधली वेळ प्रमाण मानून जगभर हे टाईमझोन्स आखण्यात आले आहेत. भारतात GMT+5:30 म्हणजेच ग्रीनीच प्रमाणवेळेच्या पुढे साडेपाच तास असा 'इंडियन स्टँडर्ड टाईम' मानला जातो. तसे भारतात पूर्वी दोन टाईम झोन मानण्यात येत, पण बऱ्याच कारणांमुळे ते मागे पडले. असो. पण म्हणजे भारतात देशभर एकच प्रमाणवेळ मानली जाते. या टाईमझोन्सनुसार देशादेशांच्या वेळेत काही तासांचा फरक असू शकतो. पण भारतात मात्र अशी एक जागा आहे जिथे गेले की माणूस तब्बल दीड वर्ष पुढे जातो.
रांची जमशेदपूर हा झारखंड राज्यातील एक मार्ग. याच मार्गावर एक घाट लागतो. तैमारा घाटी म्हणून प्रसिद्ध असा हा घाट आहे. निसर्गसंपन्नतेचे वरदान असलेला हा घाट म्हणजे काय झाडी, काय डोंगर सगळंच ओक्के गोष्ट. पण हा घाट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कुणालाही तोंडात बोटे घालायला लावणारी अशीच ही गोष्ट आहे.


