भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध क्रिकेट मालिका खेळत नसले तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही देश समोर आल्यावर जो माहोल तयार होतो तो जबरदस्त असतो. भारत जिंकल्यावर पाकिस्तानात फुटणाऱ्या टिव्ह्या बघण्यासारखा दुसरा आनंद नाही. आता यातला गंमतीचा भाग सोडा. पण भारतीय खेळाडूही आनंद आपल्याला देण्यात कधी कमी पडत नाहीत.
आजवर टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताने नेहमीच विजय मिळवला आहे. वनडेमध्येही हा विक्रम ७-० असा आहे. अपवाद फक्त २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा. त्यात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला होता



