प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या कर्तृत्वानुसार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रातील काही महान लोकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील एक नाव बघितल्यावर आरोग्यासारख्या मूलभूत विषयावर आपले संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकणाऱ्या अवलिया व्यक्तिमत्वाचा खरा सन्मान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे.
अनेकवेळा लोकांना अतिशय महान काम करणाऱ्या लोकांचे नाव त्यांना एखादा मोठा पुरस्कार मिळाला की माहिती होते. मग त्यांच्याबद्दल अधिक माहिती माध्यमांमध्ये आल्यावर त्यांचे काम किती उत्तुंग आहे याचा अंदाज लोकांना लागतो. डॉ. हिंमतराव बावस्कर हे असेच एक नाव. त्यांना पद्मश्री घोषित करून गौरविण्यात आले आहे.



