भारतात आता जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर संपत आहे. पण अचानक बातम्यांमध्ये चौथ्या लाटेबद्दल चर्चा होत आहे. चीनसह जर्मनी, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये चौथी लाट आल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. पण भारतात याचा किती धोका आहे? जर ही लाट आली तर विषाणू किती घातक ठरू शकतो. याबद्दल महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
ओमायक्रोन बी 2 (Omycron B2) हा विषाणू सगळीकडे पसरत आहे.अनेक देशांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. या सर्व गोष्टींमुळे कोरोनाची चौथी लाट आली अशी भीती निर्माण झाली आहे.



