गेल्या महिन्याभरापासून चीनविरुद्ध देशभरात संताप धुमसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बायकॉट चायना ट्रेंड देशभरात मोठ्या प्रमाणावर राबवला जातोय. लोकांनी विकत घेतलेल्या चायनीज कंपनीचे टिव्ही फोडले, एवढा हा संताप शिखरावर पोचला आहे.
हा राग चायनीज ऍप्सवरही निघाला. लोकांनी वेचून वेचून चायनीज ऍप्स डिलीट केली. पण या सगळ्यात मुख्य मागणी होती ती म्हणजे चीनच्या मुसक्या स्वतः सरकारने आवळायला हव्या. म्हणजेच सरकारने अधिकृतरित्या चायनीज प्रॉडक्टसवर बंदी आणायला हवी.








