आधुनिक भारताच्या जडणघडणीत अनेकांनी हातभार लावला आहे. पण दुर्दैव म्हणजे आजही यापैकी अनेकांची हवी तशी दखल घेतली गेली नाहीय. या यादीतील एक महत्त्वाचे आव म्हणजे डॉ. बिरबल साहनी. डॉ.बिरबल सहानी हे हवामानशास्त्रज्ञ आणि पुरावनस्पतीशास्त्रज्ञ (Paleobotanist) होते. या साहनींनी भारतात पुरावनस्पतीशास्त्राचा पाया रचला. त्यांना राम रुची साहनी या नावानेही ओळखले जाते. ब्रिटीशकालीन भारतातील पहिल्या सुशिक्षित पिढीचे ते प्रतिनिधी होते.
आजच्या लेखातून आम्ही इतिहासातल्या या अज्ञात व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहोत.






