समाजासाठी काही करण्यासाठी आपण स्वत: खूप मोठे व्यक्तीमत्व असण्याची गरज नसते. आपल्या समोर घडणाऱ्या गोष्टींत होईल तितके सकारात्मक प्रयत्न केल्यास आपले छोटे प्रयत्नही मोठे बदल घडवून आणू शकतात. उत्तर प्रदेशात एका महिलेने दाखवलेल्या एका सावधगिरीने असाच मोठा बदल घडवून आणला आहे.
रेल्वे अपघात ही तशी भारतात सातत्याने कानावर येणारी गोष्ट आहे. पण सामान्य लोकांनी बऱ्याचदा तत्परता दाखवत कधी लहान तर कधी मोठी हानी टाळली आहे. काही दिवसांपूर्वी बोभाटावर रेल्वे रूळ तुटले म्हणून घरी पळत जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना जागृत करणाऱ्या एका मजुराबद्दल तुम्ही वाचले असेल.

