शाहू महाराजांचे कोल्हापूर, साडे तीन पीठांपैकी संपूर्ण पीठ असलेल्या अंबाबाईचे कोल्हापूर, पैलवानांचे कोल्हापूर एक ना अनेक रूपे या कोल्हापूर जिल्ह्याची आहे. अशा या कोल्हापूर जिल्ह्याची माहिती आज आपण वाचणार आहोत.
कोल्हापूर जिल्ह्याला शाहू महाराजांच्या कार्याचा प्रचंड मोठा वारसा आहे. कोल्हापूर आज महाराष्ट्रात अनेक अंगांनी विकसित जिल्हा म्हणून समजला जातो. शाहू महाराज आणि नंतर झालेल्या अनेक महान लोकांनी कोल्हापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना दिली.
कोल्हापूर कलेच्या बाबतीत अनुकरणीय जिल्हा आहे. 'राजा हरिश्चंद्र' हा भारतातील सर्वात पहिला सिनेमा याच कोल्हापुरात तयार झाला होता. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात राज्य आणि देशात महत्वाचे योगदान देणारे धुरीण घडले आहेत.


